घरांच्या मुख्य दरवाज्यातून आत फुका ही 1 वस्तु..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  घरांच्या मुख्य दरवाज्यातून आत फुका ही 1 वस्तु..

आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या घरचा असतो.तुमचे घर जर वास्तूशास्त्रनुसार असेल तर घरात सुख-समृद्धी राहते.आपल्या दररोजच्या काही चुकांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये खूप दिसून येतो.

पण त्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये कारण त्या चुका सतत चालू राहिल्या तर आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य येण्याची शक्यता असते.

दररोज आपण नित्यनियमाने देवी देवतांची पूजा आराधना करतो परंतु यामध्ये काही चुका होतात व पण याकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे त्या पूजेचे आपल्याला योग्य फळ मिळत नाही.

त्यामुळे पूजा करताना संपूर्ण श्रद्धाभाव बरोबरच कधीच आपण मांसाहारचे सेवन करून पूजा करू नये.असे केल्याने तिचा देवीदेवतांचा कोप आपल्या घरावर होतो. तसेच ते एक प्रकारचे पापच मानले जाते.

तसेच एखादे धर्मग्रंथ वाचन,नामजप करतांना ही पवित्र व शुद्धतेचे आवश्य ध्यान ठेवावे.कधीही देवासमोर लावलेला दिवा फुंकर मारून विजवू नये. तसेच पूजा सामग्रीचा वास घेऊन व त्याची चव घेऊन ते देवाला अर्पण करणे.

यामुळे देवतांची अवकृपा होऊन दारिद्र्यचा शाप प्राप्त होतो.तसेच घरात रात्रीच्या वेळी नखे काढणे, नखे दातांनी काढून घरामध्ये इतरत्र टाकणे हे चुकीचे मानले जाते. या चुकीच्या सवयींमुळे राहू व केतू ग्रह आपल्याकडे आकर्षित होतात.

यामुळे जीवनात यामुळे आपली आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.तसेच कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ कचरा किंवा घाण ठेऊ नये.कायम घराला मुख्य दरवाजा स्वच्छ व सुंदर ठेवावा,

कारण त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या वर प्रसन्न होतात कारण घराच्या मुख्य दरवाज्यातून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते.

माता लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची मानली जाते, त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये टिकून ठेवणे खूप कठीण असते. घरामध्ये सर्व सुख समृद्धी असताना पैशाचा लोभ करणे तसेच पैशाचा योग्य वापर न करणे, फाटके कपडे घालने,

जुने कपडे घालून सारखे नशिबाला दोष देणे या गोष्टीमुळे घरांमध्ये घरामध्ये कधीही सुख समृद्धी जास्त दिवस टिकत नाही. या सर्वांमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढून वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो.

तसेक कधीही आपण आपल्या घरात पैशाच्या गर्वाने कुणालाही अपमान करू नये कारण त्या व्यक्तीच्या मनातून निगलेले वाईट शब्द आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

त्यामुळे ते आपल्या विनाशाचे आणि दारिद्र्यचे कारण ठरू शकते.त्याच बरोबर आपल्या दारातील आलेल्या व्यक्तीचा कधीच अपमान करू नये.आपल्या इच्छेनुसार त्यांना काही तरी अन्नदान करावे किंवा त्यांना मदत करावी.

घराच्या वास्तु शास्त्रानुसार त्या घराचा उंबरठाला खुप महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण उंबरा हा घराचा पाया मानला जातो. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबर्यावर बसणे तसेच त्यावर पाय ठेवून घरामध्ये प्रवेश करणे किंवा बाहेर जाणे ,

उंबर्‍यावर बसून जेवण करणे हे घरांमध्ये दारिद्रयतेला आमंत्रण देते. शास्त्राच्या मान्यतेनुसार ज्या घराच्या दरवाजाला चौकट किंवा उंबरठा नसेल तर ते खुप अशुभ मानले जाते आणि असा घरात लक्ष्मी कधीच निवास करत नाही.

त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजा बरोबरच घराचा उंबरठाही स्वच्छ असावा असे सांगितले जाते. तसेच या ठिकाणी कोणतेही शुभ कार्य घडू देऊ नये,

ते माता लक्ष्मीच्या आगमना मध्ये अडसर ठरू शकते. तसेच घरामध्ये कसल्याही प्रकारची तुटलेले फूटलेली वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!